Saturday, August 15, 2015

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
















आपल्या देशवासीयांच्या आणि माताभगिनींच्या पराकोटीच्या त्यागातून, वेदनेतून, कष्टाने इंग्रजांना या देशातून घालवून मिळविलेले १५ ऑगस्ट, १९४७ रोजीचे स्वातंत्र्य ! हा दिवस आपण सर्व आपला 'स्वातंत्र्य-दिन' म्हणून आनंदाने साजरा करतो.   

या आनंदाच्या दिवशी आपल्या वर्तनाने आपण हे कायम स्मरणांत  ठेवले पाहिजे कि 'यांच्या असीम त्यागामुळे आपला आजचा आनंदाचा दिवस दिसतो आहे'. 
सर्वांना 'स्वातंत्र्य-दिनाच्या' मनापासून शुभेच्छा !

कवी कुसुमाग्रज यांच्या या काव्यपंक्ती येथे देणे अनुचित ठरणार नाही.  

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
सरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

No comments:

Post a Comment