फेसबुकवर आपण केवळ राजकारणावरच लिहिणार आणि बोलणार असू, तर आपल्याला राजकारणातील घाण दिसणारच आणि त्याचा वास जबरदस्तीने आपल्याला येणे हे स्वाभाविकपणे होणारच कारण आजच्या राजकारणाचा 'दर्जा' जसे असेल तसेच अनुभव लिहिले जाणार त्यांच्या बहुसंख्य समर्थकांकडून ! येथील बहुसंख्य जणांना फक्त घाणेरडा वासच येणार कारण त्याचा उपजीविकेचा व्यवसाय वेगळा आहे त्यामुळे राजकारणातील फायदे त्याला मिळणारच नाही.
दुसरी बाब म्हणजे आपल्या लोकशाहीत किती डोके आपल्यासोबत आहेत हे मोजले जाते त्या डोक्यांत काय आहे, किंवा काय दर्जाची डोके आहेत हे मोजले जात नाही किंवा अगदी क्वचितच मोजले जाते. पूर्वी असलेली डोक्यांत काय आहे किंवा / आणि त्याचा दर्जा काय आहे हे मोजणाऱ्यांची संख्या ही जास्त होती, म्हणून बरे होते असे वाटायचे. हे आता दिवसेंदिवस कमी होत जात आहे, वेगवेगळ्या कारणांमुळे ! त्यामुळे हा अनुभव येणारच !
ठरवा आपण त्यांत किती रमायचे हे ! जगांत इतरही खूप आणि महत्वाचे विषय आहेत. राजकारण हे एकमेव जग नाही, विश्व खूप मोठे आहे.
19.12.2017
No comments:
Post a Comment