वर्तमान पत्रातील संशोधनपर लेख वाचल्यावर मला पण मी आजवर केलेले इतिहासावरचे संशोधन आठवले. अजून अपूर्ण आहे.
मी नम्रपणे सुचवू इच्छितो, की माझं पण नवीन सनसनाटी संशोधन येतंय, पुराव्यांकडे ‘काणाडोळा’ न करता ! थोडक्यात काही निष्कर्ष -
१. हिंदवी स्वराज्यांत त्या वेळच्या छत्रपतींनी त्यांच्या दरबारी फक्त मुस्लीमांचाच आणि मुघल शासक व सर्व पातशाह्यांनी त्यांच्या दरबारी फक्त हिंदुंचाच भरणा करण्याचे ठरवलं होतं.
२. सर्वधर्मसमभाव हा त्या वेळीपासूनच काय पण महंमद घोरीच्या आक्रमणापासूनच आहे. महाराज पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप यांनी यांत अडथळा आणल्याचे पुरावे मिळून आले आहेत.
३. मुघल शासक व पातशाह्यांमधील अतिक्रमण विभाग हा स्वाभाविकच हिंदुंकडे असल्याने त्यांनी नि:पक्षपणे बरीच मंदीरे, देवळे, मठ यांना अतिक्रमण केले असल्याने कायद्याचे राज्य म्हणून नेस्तनाबूत केले.
४. हिंदवी स्वराज्यात स्वाभाविकच सर्व मुस्लीम मंडळी कामाला असल्याने, ती या अतिक्रमणाच्या बाबतीत कामचुकार नव्हती.
५. हिंदवी स्वराज्यात असलेल्या सर्व मुस्लीम कर्मचाऱ्यांनी सर्वधर्मीय मान ठेवायचा म्हणून, सुभेदाराची सून किंवा कोणत्याही स्त्रीला, अजिबात धक्का लागू दिला नाही. या उलट मुघल शासन व पातशाह्यांमधे त्यांचे कर्मचारी हे बहुसंख्य असलेल्यांनी अल्पसंख्यांकासाठी त्याग करायला हवा या उदात्त हेतूने फक्त हिंदुंकडूनच सर्व अपेक्षा पूर्ण करवून घेतल्या. त्याला निष्कारणच लूटमार, अत्याचार वगैरे शब्द वापरण्याची फॅशन आली आहे.
सध्या इतकेच !
19.2.2018
No comments:
Post a Comment