कोर्टाला हिवाळी सुट्यांचे वेध लागले आहे. घाईचीच कामे दाखल करून चालवण्याची गडबड ! आज मात्र कामाच्या गडबडीत विश्रांती म्हणून थोडा निवांतपणा काढला आणि जुने चित्रपटगीत ऐकले.
जळगांवला चित्रा टॉकीजमधे खूप वर्षांपूर्वी न समजत्या वयात हा चित्रपट पाहिला होता. ‘मुंबईचा जावई’ ! कै. व. पु. काळे यांच्या कथेवरून हा चित्रपट कै. राजा ठाकूर यांनी दिग्दर्शीत केला आहे. समर्थ गीत - कै. ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत - कै. सुधीर फडके यांचे तर गायनस्वर - रामदास कामत यांचा !
पं. रामदास कामत हे काही चित्रपटांची गीते गाणारे गायक नाही, शास्त्रीय संगीतातील हे नांव ! पण काही शास्त्रीय संगीत गाणारे गायक अशी काही गाणी गाऊन जातात आणि खरोखर चित्रपट संगीताला त्या निमित्ताने एक नवा अलंकार मिळतो. कलावती रागातील हे गीत, खरोखर छानच आहे.
प्रथम तुझ पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला
स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
प्रथम तुझ पाहता
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
प्रथम तुझ पाहता
नयन का देहही मिटुनी तू घेतला
जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
प्रथम तुझ पाहता
जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
प्रथम तुझ पाहता
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला
प्रथम तुझ पाहता...
धावता रथ पथी पळभरी थांबला
प्रथम तुझ पाहता...
20.12.2017
https://www.youtube.com/watch?v=Pl41q9YH8LE&feature=share
No comments:
Post a Comment