Friday, September 15, 2017

'मरणान्ति वैराणि'

'मरणान्ति वैराणि' 

आपण नेहमी गल्लत करत आलेलो आहे ती 'मरणान्ति वैराणि' या संज्ञेची ! हे प्रभू रामचंद्रांनी सांगीतले ते लंकेचा राजा रावणाच्या अंत्यसंस्काराचे वेळी बिभीषणाला ! त्या वेळी हे आता आपण सोईस्करपणे विसरतो की प्रभू रामचंद्रांनी लंकेशाबरोबर त्याच्या चुकीचे प्रायश्चित्त द्यायचे या हेतूनेच तोपावेतो वर्तन केले होते.
मेलेल्या बद्दल वाईट बोलू नये हे जितके खरे आहे तितकेच त्याचेसंबंधाने खोटे बोलू नये हे पण आवश्यक आहे.
जिवंतपणी त्याने जी काही कृत्य भलीबुरी केलेली असतात ती आणि त्याचे परिणाम ती व्यक्ती मेल्यावर आपोआप संपून जात नाहीत तर त्याच्या कृत्याचे चांगलेवाईट परिणाम राहिलेल्यांना भोगावेच लागतात, याबद्दल काय करायचे हे स्पष्टीकरण कोण देणार ? ते कोणी दिले किंवा अगदी कायद्यात वा आपल्या संस्कृतीच्या सामाजिक संकल्पनेत असले तर ते सहन व मान्य करण्याची आपली हिंमत आहे का ?

१० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment