Monday, December 4, 2017

वेगवेगळी राज्ये

वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यासाठी न थकता किंवा वेळप्रसंग पाहून कमी-जास्त प्रभावी वातावरण निर्माण करणे, ते जर अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर खरे-खोटे विषय निर्माण करून त्याला भावनिक खतपाणी घालणे, त्यावेळी आपल्यावर मोठे राज्य असल्याने भयंकर अन्याय होतो आहे, याची खरी-खोटी बोंब ठोकणे आणि त्या सर्वांवर एकमेव, खात्रीशीर व भरवशाचा उपाय म्हणजे फक्त वेगवेगळी, छोटीछोटी राज्ये निर्माण करणे हाच होय !
हे म्हणजे आपल्या घरातील कर्तेपण जाणीवपूर्वक नालायक, संधीसाधू आणि पक्षपाती व्यक्तीला द्यायचे, तो घरातील सदस्यांशी पक्षपाताने वागला की त्यांवर उपाय म्हणजे त्याला बदलून टाकणेपर्यंतचा मार्ग, शोधण्याऐवजी घरातील सदस्यांनाच दुसऱ्याच्या स्वाधीन करायचे किंवा वेगळे व्हायला सांगायचे, असे झाले आहे ! 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हे मानणाऱ्यांना हे पटणे शक्य नाही. या विचारांची कर्तृत्ववान माणसें ज्यांना दिसत नसतील तर अशी जबाबदारी देतांना आणि निवडतांना आपली दृष्टी स्वच्छ ठेवा, भरपूर माणसे दिसतील. अगदी अशी आणि हीच दृष्टी ठेवली तर, सध्या असलेली हीच माणसे पण व्यवस्थीत वागतील, अगदी 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'कृण्वन्तो विश्वमार्यंम्' हेच डोळ्यांसमोर ठेवून !
स्वतंत्र विदर्भ हवा, आता स्वतंत्र मराठवाडा हवा, मग स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र किंवा कोंकण किंवा पश्चिम महाराष्ट्र का नको ?

२. १२. २०१७

No comments:

Post a Comment