Saturday, January 18, 2020

अलिकडच्या मनस्ताप देणाऱ्या घटना बघीतल्या, विशेषत: जनतेला भेटीचे औदार्य पण न दाखवणारे राज्यकर्ते बघीतले, की कित्येक विचार मनांत येतात. फार थोडे मांडतां येतात.
पूर्वजांच्या पुण्याईची फळे सर्वांनाच मिळतात असे नाही, काहींच्या वाट्याला अजूनही काटेच येतात. पांडवांचा वनवास बारा वर्षांनी व वर्षाच्या अज्ञातवासाने, प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपतो. हे सर्व अवतारी पुरूष !
राणा प्रताप यासारख्या रणधुरंधराचा वनवास मरेपर्यंत संपला नाही, शेवटपर्यंत आपल्या चितोडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा स्वातंत्र्यवीर गवताच्या गादीवर झोपताझोपता स्वर्गवासी झाला !
काहींचा वनवास त्यांच्या मृत्युनंतर संपतो, त्यांच्या योगदानाची जाणीव कृतज्ञतेने ठेवली जाते. काही दुर्दैवी जीवांचा वनवास, मात्र त्यांच्या मृत्युनंतर पण संपत नाही.
या ऐतिहासिक पुरूषांची, भल्याभल्यांची ही अवस्था तुम्हीआम्ही केली, तर अलिकडचेच असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा ? —- शिंतोडे उडवायला काय जाते आमचे ! गंगोदकाचे काय आणि गटारीच्या पाण्याचे काय ? आमची जशी लायकी ते पाणी आम्हाला आवडेल !

4.1.2020

No comments:

Post a Comment