Sunday, December 21, 2014

शालेय जीवनातील आठवणी - 2

मित्रांनो मला माझ्या शालेय अभ्यासक्रमात ही कुसुमाग्रजांची कविता होती आणि श्री एस आर कुलकर्णी सरांनी ती अतिशय तन्मयतेने आणि छान शिकविली होती. ती माझ्या आजही स्मरणात आहे. (श्री एस आर कुलकर्णी सर सध्या भुसावळला असतात - मी सरदार जी जी हायस्कूलचा विद्यार्थी आहे )

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्‍त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्‍तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

प्रश्न हा आहे कि अशा शिक्षकांना आजच्या समाजात आणि शाळेत काही किंमत राहील का किंवा आजच्या शाळेत असे शिक्षक घेतले जातील का आणि पुढे ते टिकू शकतील का?

No comments:

Post a Comment