Tuesday, October 3, 2017

भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल

भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल

वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आतापर्यंत आजच्या भारताच्या आर्थिक स्थितीबद्दलचे जे मत व्यक्त केले आहे आणि अजूनही करत आहेत, ते पाहून मला एका नाट्यप्रवेशातील आठवण झाली. 

‘आजारी रोग्याचा’ आजार कसा बरा होईल हे सांगणारे ॲलोपथीचे डॉक्टर, त्याच्या नेमके विरूद्ध सांगणारे धन्वंतरीचे वंशज म्हणवून घेणारे वैद्यराज आणि दोघांच्या म्हणण्याला छेद देत जालीम उपाय सांगणारा वैदू ! यांच्या वादविवादात कोण श्रेष्ठ यांवरच चर्चा सुरू असतो, ‘रोग्याच्या’ प्रकृतीची कोणालाही काळजी नसते.
इथे तर अर्थव्यवस्था महासत्तेकडे वाटचाल करत आहे येथपासून ते अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहे, हे सांगणारे अर्थतज्ञ हे भारतातीलच आहे ही गंमतच ! देशासंबंधाने गंभीर व जिव्हाळ्याच्या विषयाचा आपल्या पक्षाच्या अभिनिवेशापायी असा बळी देवू नका !
विद्वानाकडून आपली संस्कृती हे अपेक्षित करत नाही, तर कटू असले तरी सत्याचीच अपेक्षा करते; याची तरी चाड ठेवा ! जर देशहितासाठी आवश्यक असेल तर खरोखरच काही योग्य मार्ग सांगा तर लोक तुमच्यावर विद्वान व अर्थतज्ञ म्हणून विश्वास ठेवतील. नाही तर तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे हे जनतेला माहिती आहे, त्यासाठी असे काही सांगण्याची आवश्यकता नाही.

दिनांक २८ सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment