छत्रपती शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची बोटे लालमहालात रात्रीच्या वेळी कापून, ताबडतोब पुण्यातून स्वराज्यावरील संकटाचा वेढा उठवला होता.
नरवीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी शत्रूच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापून आणले होते. त्यावेळी शत्रूची पाचावर धारण बसली होती.
लढाई फक्त समोरासमोर खेळली जात नाही. जय किंवा पराजय हे समोरासमोरच्या लढाईतच ठरतात असे नाही. या आपल्या पूर्वजांच्या न खेळलेल्या पण विजयी लढाया आणि त्यातले तंत्र परकीय शिकून आत्मसात करतात आणि त्याप्रमाणे वागतात. आम्ही फक्त आमच्या शूरवीरांचा आणि कणखर राज्यकर्त्यांचा, या ना त्या कारणाने, महाभारतातील मद्रराज शल्याप्रमाणे आपल्याच सेनापतीचा तेजोभंग करून ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ करत समोर मिळणाऱ्या विजयरूपी सुग्रास भोजनांत माती कालवतो.
24.2.2019
No comments:
Post a Comment