काल पुण्यात श्री. किशोर जोशी यांच्याकडे, म्हणजे गांवच्या माणसाकडे गेलो होतो. निदान तीन तपे होवून गेली असतील त्यांना गांव सोडायला, पण त्यांच्या मनांत तिकडील आठवणी जिवंत आहेत, त्या जपल्या आहेत. इतकेच नाही तर, मध्यंतरी एक-दोन वेळा गांवी येवून, त्यांत भर पण घातली आहे. सायंकाळी सहकुटुंब गेल्यावर बघताबघता गांवाकडील गप्पांतून घरगुती गप्पांत येत चार तास कसे निघून गेले समजलेच नाही. आमच्या गप्पांत दोघांच्याही आठवणींत भर पडली !
शेवटी मला पुन्हा यावे लागावे, म्हणून जेवतांना शेवटचा भात घ्यावा लागला. गप्पांचे भरतवाक्य दोघांच्या गृहमंत्र्यांनी एकमेकांना सक्रांतीचे वाण देण्यात झाले. ‘आता इकडे (पुण्यात) किंवा तिकडे (औरंगाबादला) आले तर भेटल्याशिवाय जायचे नाही’ यांत झाले.
23.1.2019
No comments:
Post a Comment