Saturday, March 16, 2019

अ - आ आणि उ = अभिमान, आनंद आणि उन्माद !

अ - आ आणि उ = अभिमान, आनंद आणि उन्माद !
नुकताच पुलवामा येथे भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलावर, आपला शेजारी पाकिस्तानने ‘जैश-ए-महम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या मार्फत, निर्घृण हल्ला केला. आपले कित्येक पोलीस त्यांत मृत्युमुखी पडले. काही जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी उघडपणे ‘जैश-ए-महम्मद’ने घेतली. या आणि अशा कित्येक दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनांचे आश्रयस्थान पाकिस्तान आहे, हे जगातील उघड गुपीत आहे.
आजपावेतोचा अनुभव जमेस धरला तर, पाकिस्तान कायमच, आपल्या भारताची शांतता, आपल्यावर वेळोवेळी हल्ले करून, आक्रमण करून, लूटमार करून, नागरिकांवर व निरपराध माणसांवर अत्याचार करून धोक्यात आणण्याचे काम केवळ त्याच्या जन्मापासूनच करत नाही; तर या विचाराची मंडळी ही पाकिस्तानच्या जन्मापूर्वीपासून करत आहे. त्यातील सर्वच पाकिस्तानांत आहेत असे नाही, तर काही त्यांची समर्थक मंडळी, ही आज पण, आपल्या भारतात सुखेनैव नांदून, आपल्याला त्रास देण्याचे कार्य करीत आहे. काही तर मोक्याच्या ठिकाणी आहेत. हा काळ कधीपासून मोजायचा, तर तो तुम्ही कितीही मागे नेवू शकता, थेट या विचारांच्या व धर्माच्या लोकांची आक्रमणे भारतावर सुरू झाली तोपावेतो !
विविध काळात झालेली विविध क्रूर आक्रमकांनी आणि त्यांच्या आक्रमणांनी आपल्या संस्कृतीवर, समाजजीवनावर कठोर आघात केले. त्यातून आपला एकेक भाग आपल्यापासून अलग होत होत, शेवटी आजचा भारत सध्या शिल्लक आहे. आपल्याला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यासर्वांचीच एक विभागणी झाली. मुस्लीमबहुल भाग हा पाकिस्तान म्हणून अस्तित्वात आला; तर राहिलेला खंडीत भाग हा भारत म्हणून शिल्लक राहीला. बरीच संस्थानिक पण होती, पण हा प्रश्न खंबीरपणे बहुतांशी सोडवला गेला. घोळ सध्या आहे, तो काश्मिरचा ! यांची कारणमिमांसा हा इथं विषय नाही. सध्या यांत पण काश्मिरचा काही भाग पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यात आहे. एक मात्र नक्की, की आपल्याला जास्त उपद्रव दिला व आपल्यावर जास्त आक्रमणे, ही मुस्लीमांनी केलेली आहेत. त्यामुळे येथील आपणा कोणाच्याही मनांत मुस्लीमांबद्दल, आक्रमक व हल्लेखोर अशी विशिष्ट भावना तयार होणे, हा आजपावेतोच्या पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवाचा भाग आहे, त्यांत लपविण्यासारखे अथवा कोणालाही गैर वाटण्यासारखे काहीही नाही, कारण हा इतिहास आहे. त्यापासून कोणी पळ काढू नये, ते स्वत:लाच फसविण्यासारखे ठरेल.
अपेक्षा होती आणि अजूनही आहे, की १९४७ ला जी धर्माच्या आधारावर जी फाळणी झाली किंवा स्विकारली गेली किंवा करावी लागली, त्यावेळी भारताने स्वातंत्र्य मिळवले ते हिंदुबहुल प्रदेशाचे, कारण तुकडे होता होता, हा एवढाच प्रदेश शिल्लक होता. त्यातून मुस्लीमबहुल प्रदेश वेगळे राष्ट्र म्हणून निर्माण झाले होते. ज्यांना कोणास तिकडे जायचे असेल किंवा इकडे यायचे असेल त्यांना मुभा होती. आपल्या संस्कृतीच्या चांगुलपणावर, निरूपद्रवीपणावर, भित्रेपणावर, मूर्खपणावर, आदर्शवादीपणावर विश्वास असल्याने म्हणा किंवा ‘आम्ही इथले जेते आहोत’ या भावनेमुळे म्हणा किंवा या भागाला आपली भूमी मानून, बरीच मुस्लीम मंडळी इथं थांबली. इथं थांबल्याने त्यांचे काही नुकसान झाले, असे म्हणता येत नाही, कारण त्यांचे येथील लोकसंख्येतील प्रमाण वाढलेले आहे. भारतीय राज्यघटनेने ‘सर्व भारतीय समान’ हे तत्व स्विकारल्यामुळे, ते योग्य पण आहे, विविध महत्त्वाच्या पदांवर मुस्लीम मंडळी पोहोचली. त्यांनी ती पदे सांभाळली आणि काहींनी भूषविली, तसेच काहींनी दुरूपयोग पण केला.
या सर्व गदारोळात, या बऱ्याच सव्यापसवव्याचा आणि विविध भल्याबुऱ्या अनुभवांतर, येथील मूळ संस्कृती आपली मानणाऱ्या, सर्वसामान्य माणसाची अपेक्षा ही होती, की ज्याप्रमाणे भारतात मुस्लीमांना वेगळे न मानता, भारतीय म्हणून सामावून घेतले, त्याचप्रमाणे पूर्वीच्या या हिंदुस्तानातील भागाने, म्हणजे नंतर झालेल्या पाकिस्तानने पण हिंदुंना सामावून घ्यावे. ही अपेक्षा अवाजवी अथवा गैर किंवा बेकायदेशीर म्हणता येणार नाही. मात्र अनुभव जो आला आणि प्रत्यक्षात परिणाम जे दिसत आहेत, ते म्हणजे पाकिस्तानातील किंवा नंतर झालेल्या बांगला देशातील हिंदुंच्या लोकसंख्येचे प्रमाण कमालीचे घटले आणि दिवसेंदिवस घटत आहे. हा परिणाम सर्वांना तिथं समान वागणूक नाही, तर तेथील हिंदुंचे पद्धतशीरपणे, जुलूमजबरदस्तीने खच्चीकरण करून, नायनाट केला जात आहे, हे स्पष्ट करणारा आहे. यासाठी अवास्तव पुराव्याची आवश्यकता नाही. हा सल येथील, हिंदुधर्मबांधवांना किमान मानवतेच्या दृष्टिकोनातून वाटला, किंवा आजच्या परिचित भाषेत बोलावयाचे झाले, तर मानवाधिकारानुसार वाटला, तर त्यांत वावगे काय ? अपेक्षा तर आहे, येथील मुस्लीमांना पण वाटावयास हवा. क्षणभर समजू या, की परक्या देशांच्या वर्तनांत वा धोरणांत आपण लक्ष घालणे बरोबर नाही. त्यांनी त्या देशात रहायचे ठरवले, मग त्या मागे कोणतेही कारण असो, त्याचे भलेबुरे परिणाम हे त्यांनी भोगावयास तयार असावयास हवे. इथपर्यंत ठीक आहे.
भारतीय राज्यघटनेप्रमाणे अपेक्षा ही आहे, की सर्व भारतीय समान आहेत, कोणीही परका नाही आणि तसे मानणे किंवा दाखवणे पण बरोबर नाही. असे जर कोणी वागत असेल, असे वागण्याला प्रोत्साहन देत असेल, मग ते प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष, ते होकारार्थी असो किंवा नकारार्थी, ती कृती मदतीची असो किंवा विरोधाची, तर ती कृती व वर्तन हे स्पष्टपणे घटनाबाह्य आहे. मात्र हा आदर्श नेहमी बोलायला किंवा पुस्तकांत शोभून दिसतो, प्रत्यक्ष आचरणांत आणणे हे सोपे नाही. त्यामुळे स्वार्थ व हितसंबंध धोक्यात येतात, आपल्याला नुकसान होवू शकते. त्यातून मग घटनाबाह्य कृतींकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करणे सुरू होते. कोणी लक्षात जरी आणून दिले, तरी त्याप्रमाणे वर्तन टाळता कसे येईल याकडेच आपला कल रहातो; परिणामी घटनेप्रमाणे वर्तन होईल, हा सर्वसामान्यांचा विश्वास उडतो. त्यांत आपल्या लोभापायी व आसुरी महत्वाकांक्षेपायी त्याला थांबविण्यास कोणी तयार होत नाही. जो थांबविण्याचा प्रयत्न करेल, त्याला संपविले जाते, हे लक्षात आल्यावर, त्या फंदात फारसे कोणी पडत नाही आणि ही घटनाविरोधी मंडळी मजबूत होत जातात. यांवर उपाय करण्याचे म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम, हे सरकारने करावे, हे अपेक्षित असते. ते करत नाही, कारण त्यांना पुन:पुन: सत्ता हवी असते, त्यासाठी निवडून यावे लागते. या गुंडगिरीला हाताशी ठेवले, तर निवडून येणे तुलनेने सोपे जाते. मात्र हे जास्त काळ सहन करण्यासारखे नसल्याने याविरूद्ध व्यक्त होण्याचा मार्ग स्विकारला जातो, तो निवडणुकांचा ! यांतून सरकार बदलविता येते.
कोणाला सापत्नभावाची वागणूक मिळते, तर कोणाला लाडाकोडाची; यांतूनच मग संघर्ष सुरू होतो. स्वातंत्र्यापासून निवडून येण्यासाठी जी गणिते मांडली जातात, त्यांत मुस्लीम समाज परिणाम करणारा घटक आहे. त्याला गोंजारणे आले, हेच स्वातंत्र्यप्राप्तीच्या कटू आठवणींच्या पार्श्वभूमीवर इतरांना सहन करणे सोपे नसते, मनांत सल रहातो. हा सल कायम राहील असे वर्तन टाळण्याऐवजी, जर त्यांत वाढ झाली तर समाजांत तेढ निर्माण होते; हेच काम आजपावेतो बहुतेक सरकारे करीत आलेली आहे.
आपल्या समाजातील कोणत्याही गटाची, ‘आपण काहीही केले, तरी आपले कोणीही, काही वाकडे करू शकणार नाही’ किंवा ‘आपल्यावर कितीही अन्याय झाला, तरी आपला कोणीही वाली नाही’ अशी भावना होणे अत्यंत वाईट ! असे झाले की ‘लाडक्यांत’ आडमुठेपणा येतो, पूर्वीचाच असेल तर तो अजून वाढतो आणि हा त्यांचा ‘घटनादत्त अधिकार’ आहे हा समज होतो. त्याला प्रतिबंध केला जात नाही, मग ‘आपलेच बरोबर’ ही भावना होते. ही भावना झाली, की लाडक्यांना ‘उन्माद’ होतो, परिणामी नावडत्यांचा रोष वाढतो.
नावडत्यांनी हे लाडक्यांचे अन्याय्य वागणे सहन करावे, म्हणून त्यांना चुचकारलं जातं, समजवले जाते. ‘काही काळ सहन करा, नंतर पाहू.’ ते ऐकतात, पण ती नंतरची वेळ कधीच येत नाही. ‘हे कुठं तरी संपवले पाहीजे’ या भावनेतून एकत्र आपोआप येतात, हक्कांच्या रक्षणासाठी ! मग त्यांना आठवण येते, ती त्यांच्या स्फूर्तीदेवतांची ! मग ते प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, दुर्गाभवानी असेल, भगवान शंकर असतील, विद्येची देवता सरस्वती वा गणपती असतील ! अगदी महाराणा प्रताप असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील ! संत ज्ञानेश्वर असतील, संत रामदास असतील, संत चोखा मेळा, संत सावता माळी, संत सेना महाराज, संत नामदेव, गुरू नानकदेव, संत कबीर, संत मीराबाई कोणीही असतील ! अगदी अलिकडचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र, पं. नेहरू, वल्लभभाई पटेल असतील ! वासुदेव बळवंत फडके, सरदार भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस कोणीही असतील ! यांना विरोध मग सहन होत नाही, ‘कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असला तरी’ !
मग पुढचा टप्पा येतो, तो या देशाची श्रद्धास्थाने कोणती आहे, याचा ! या मातीत जी जन्माला आली, इथल्या संस्कृतीला ज्यांनी आपले मानले, त्यांच्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, अगदी सोपी आणि स्वाभाविक आणि याला जाणीवपूर्वक धक्का लावला, तर त्याबद्दल काय ?
हे सगळं आदर्शाप्रमाणे, अगदी कोणाच्याही आदर्शाप्रमाणे, प्रत्यक्षात शक्य नसल्याने प्रश्न निर्माण होतात आणि नाईलाजाने ते वैयक्तिकरित्या, समाजाला वा राज्यकर्त्यांना सोडवावे लागतात, समाज स्वास्थ्यासाठी, समाजसुरक्षेसाठी आणि समाजव्यवस्था नीट टिकून रहावी यासाठी ! मग त्यांत या कोणाच्याही भावनांना अर्थ रहात नाही.
मात्र येथील संस्कृतीला, जीवनपद्धतीला आणि येथील माणसांना आपले समजून आपले स्वत:चे आचरण ठेवले, मग तुमची उपासनापद्धती कोणतीही असो, तर ते नक्कीच अभिमानास्पद आहे. असे अभिमानास्पद वर्तन जर आपले नित्याचरण समजत असेल, तर खरंच हा आनंदाचा भाग आहे. मात्र हे असे न करता, त्याच्या विपरीत वर्तन करणे, आणि त्याचे जाहीर प्रदर्शन करणे हा उन्मादाचा भाग आहे. अभिमान आणि आनंद हे शब्द चांगली भावना, कृती, वर्तन दर्शवितात, तर उन्माद हा शब्द वाईट भावना, कृती व वर्तन दर्शविते. समाजाला, देशाला मदत करणाऱ्या बाबी या चांगल्या आणि नुकसान पोहोचविणाऱ्या बाबी या वाईट, याबद्दल कोणाचे दुमत असणार नाही.
भारताच्या विजयांत ज्यांना आनंद दिसतो आणि तो जर त्यांनी व्यक्त केला, तर त्यात उन्मादाचा प्रश्न कुठं येतो. भारताचा विजय खरोखरच झाला आहे किंवा नाही, सरकारतर्फे जे सांगण्यात येते, त्यांवर आपण विश्वास न ठेवता, संशय व्यक्त करतो; इतकेच नाही तर ते स्पष्टपणे नाकारत खोटे आहे म्हणून सांगतो. त्यावेळी दोन बाबींची शक्यता असते, ती म्हणजे सरकारच्यातर्फे काहीही सांगीतले गेले, तर सरकार हे आपल्या विचाराचे किंवा पक्षाचे नसल्याने, त्याला विरोध करणे आवश्यक असते, अन्यथा जनतेत याचा त्यादृष्टीने चुकीचा संदेश जाईल, तो आपल्या पक्षाच्या विरूद्ध जाईल. दुसरी बाब म्हणजे, आपल्या पक्षाचे वर्तन आणि धोरण, हे जर या सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे झालेल्या परिणामांच्या विरूद्ध असेल, तर मग याला कोणत्याही पद्धतीने विरोध करणे आवश्यक होवून बसते. आपण या विरोध करण्याच्या भूमिकेत, इतके वहावत जातो की आपल्या सेनेने दिलेली माहिती पण आपण खोटी आहे, असे सांगत त्यांवर अविश्वास दाखवतो. हे वर्तन आपल्या सेनेच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करणारे असल्याने, सेनेला कमकुवत करणारे आहे, पर्यायाने देशविघातक कृती आहे आणि म्हणून उन्मादाची कृती आहे.

3.3.2019

No comments:

Post a Comment