Wednesday, June 13, 2018

औरंगाबादची दंगल

औरंगाबादची दंगल 

औरंगाबादची नुकतीच झालेली व दंगल म्हटली गेलेली घटना बघीतली, तर यांमागची कारणं शोधायला हवी वगैरे ठरलेली पोपटपंची करणे हे आपल्या नित्याचे आहे की ज्यांचा फारसा उपयोग नाही. तात्कालिक कारण कोणतेही असो, ते अजिबात महत्वाचे नसते.
आपल्या काहीही मनाविरूद्ध झाले, तर या विचाराची मंडळी व त्यांचे अनुयायी हे असेच वागणार असतात, आणि आजवरचा इतिहास व अनुभव हेच सांगतो. यांवर ‘विश्वामित्री पवित्रा’ कोणीही घेवू नये. त्यामुळे उपाय सापडत नाही आणि प्रत्येक वेळी याची वेगवेगळी कारणे पुढे येतात. विशेष आश्चर्य हे की अशी कृती करणारी माणसं आणि त्यांचे अनुयायी तेच असतात. सबब वरवर दिसणारे किंवा सांगीतले जाणारे, या घटनेचे कारण हे खरेखुरे कारण नसून, ही असा विचार करणारी माणसं कारण आहेत. यांनी अशी काही कृत्ये केलीत की त्यांवर स्वसंरक्षण ही प्रतिक्षिप्त क्रिया किंवा अपवादाने आक्रमण ही क्रिया समोरच्याकडून होणार आणि मग आपले सरकार त्यांना पकडून, त्यांच्यावर केसेस भरणार. मात्र ही अशी सुरूवात करणाऱ्यांवर लुटूपुटूच्या केसेस करणार की ज्यांवर सर्वजण हसतील. हे काहीही उपयोगाचे नाही. यांवर म्हणजे, दोन्हींवर उपाय शोधायला हवा.
आपला समाज, समाजशासक जोपर्यंत मतलबी अर्धसत्याचा किंबहुना असत्याचा त्याग करून निर्वेध त्रिकालाबाधीत वस्तुस्थितीवर आधारीत सत्य स्विकारत नाहीत, तर त्याऐवजी आपण स्विकारलेल्या मतलबी अर्धसत्याचे गुणगान गात तेच खरे असल्याचे सांगत असतील, तर परिणाम हेच होणार !
यांवरील कारणांची कठोर व तर्कशुद्ध मीमांसा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी जोपावेतो करत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.
(काल Praveen Bardapurkar यांची पोस्ट वाचली, आणि हे जाणवलं)

१९. ५. २०१८

No comments:

Post a Comment