Wednesday, June 13, 2018

‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले

‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले
Image may contain: 1 person

आज भावगीताच्या आकाशात शुक्रताऱ्याप्रमाणे चमकणारे ‘अरूण दाते’ आमच्यातून कायमचे गेले.
आम्ही गेली कित्येक वर्षे ऐकतोय, तसेच आमची मागची पिढी पण ऐकत आली आहे, ही भावगीते ! कै. मंगेश पाडगांवकरांचे भावविभोर शब्द, या शब्दांतील लिहीलेले व न लिहीलेले भाव आपल्या समर्थ संगीताने दृष्टीला दाखवणारे व कानाला ऐकवणारे श्री. यशवंत देव आणि हे भावविभोर शब्द, त्यांतील भाव आपल्या ह्रदयापर्यंत पोहोचविणारा हा ‘शुक्रतारा’ ! आता सांगावे लागणार - कै. अरूण दाते !
यांचे हे गीत -
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥
राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा”
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥
राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
“उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा”
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥
तिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे ?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?”
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी ॥३॥
का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी ॥४॥
गीतकार : मंगेश पाडगावकर
संगीतकार : यशवंत देव
गायक : अरुण दाते


६. ५. २०१८

No comments:

Post a Comment