Thursday, June 27, 2019

काल भल्या पहाटे रावेरहून औरंगाबादला आलो. खूप उशिरा झोपल्याने, उशीरा उठलो. त्यावेळी जाणवले, आता यापुढे एकटेच उठावे लागणार आहे. पूर्वी दूर कुठेतरी आई-वडील असायचे. ते पण पूर्वी सकाळी उठले असतील, असा मनात विचार असायचाच ! अगोदर वडील कायमचे सोडून गेले, आणि अलीकडे दिनांक २२ मे, २०१९ रोजी आई ! ---------- यापुढे ते पण उठले असतील हा विचार मनांत येऊन चालणार नाही, शक्य आहे का ते ? त्रास होईल. किती दिवस जाणवेल ?
---------- आठवण येवो, का न येवो, नित्य उठावे तर लागणार होते. आज नेहमीप्रमाणे उठलो, आपल्या नित्य कामाला तर लागावेच लागणार आहे.

6.6.2019

No comments:

Post a Comment