आपण आपले गांव सोडून दुसरीकडे गेलो, की वेगवेगळ्या अशा आठवणी प्रकर्षाने येतात. मुख्य म्हणजे लवकर मनातून जात नाहीत. त्या आठवणीत कित्येकदा कोणाला काही विशेष आहे, असे वाटतही नाही. मात्र आपल्या मनांत रुतून बसलेल्या या आठवणींचा हा एखादा बाण, झालेल्या जखमेवर उपचार करण्यासाठी उपसून काढावा, तर जखमेवर उपचार करण्याऐवजी, अजून दुसऱ्या आठवणींचे रक्त मनाच्या कप्प्यातून भळभळ वाहू लागते.
19.7.2019
19.7.2019
No comments:
Post a Comment