कायदा हा समाजाची व समाजात मानली गेलेली, तसेच समाजाने स्विकारलेली नितीमूल्ये यांवर ठरतो.
मात्र तुमचे आमचे, आपणा सर्वांचे अधिकार, हे समाजात सुव्यवस्था व शांतता नांदेल, त्यांत अडथळा येणार नाही, वा अन्य कोणा समाजधटकांवर अन्याय होणार नाही, हे लक्षात घेवून ठरवलेले असतात.
समाजाच्या विकासाचे धोरण आखतांना, शासनास तत्कालीन अंमलात असलेला कायदा आणि जनतेचे, समाजघटकांचे अधिकार, यांचा समन्वय साधावा लागतो. ज्यावेळी जनतेच्या एखाद्या घटकाचे अधिकार, समाजाच्या विकासासंबंधीच्या धोरणाच्या आड येत असतील, तर समाजघटकाचे अधिकार, काहीवेळा संकुचित करावे लागतात. मात्र अधिकार हे नैसर्गिक व मूलभूत असतील, तर त्यांवर नियंत्रण आणता येत नाही, वा ते संकुचित करता येत नाही.
14.10.2019
No comments:
Post a Comment