Sunday, May 10, 2020

कालचा 'व्हॅलेंटाईन डे' झाला. कोणी कोणाला कोणती 'गिफ्ट' आणली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं याच्या चर्चा सुरू आहेत. काहींना या दिवशीपण काहीही आणता आलं नाही, याची पण एकतर्फी चर्चा सुरू असते.
या निमित्ताने एक संकेत म्हणून काहीतरी भेट द्यायची पद्धत आहे, हे ठीक आहे पण काही 'गिफ्ट' आणलं किंवा काहीच आणलं नाही त्यानं खरोखर आपल्या मनांतील भावनांत काही फरक पडतो का ? एकमेकांच्या वागण्यातून, कृतीतून एकमेकांचे अस्तित्व जेव्हा दिसायला लागते, आपल्याला भले ते दिसत नसेल, जाणवत नसेल मात्र इतरांना ते नक्कीच दिसते, त्यावेळी सर्वच आपल्याला ते जाणवून देतात. आपल्याला ते दिसत नाही कारण आपण जेव्हा एकरूप झालेले असतो. त्यावेळी हे पहाण्यासाठी आपले बाह्यचक्षू फारसे उपयोगी रहात नाही; तर त्यासाठी अंत:चक्षूची मदत घ्यावी लागते. मग अगदी स्वच्छ दिसायला लागते, आजपावेतो न दिसलेले दिसायला लागते, जाणवायला लागते. लिंबाचे लोणचे मुरल्यावर ते खातांना जे समाधान लाभते, तसे ! असे लोणचे मुरलेल्यांना रोजच 'व्हॅलेंटाईन डे' असतो.

15.2.2020

No comments:

Post a Comment