Sunday, May 10, 2020

समजायला खूप सोपं, मात्र उमजायला कठीण आणि कृतीला तर कर्मकठीण ! —- खास आम्हा भरतखंडवासियांसाठी !
तसं बघीतलं, तर खूप सोपं आहे हो, की कोण बदललं आहे आणि कोण धोकेदायक आहे आणि कोण मदतनीस आहे, कोण शत्रू आहे आणि कोण मित्र आहे, ते शोधणे ! या निकषावर गेल्या दोन-चार हजार वर्षांपासून ते आजपावेतोचा इतिहास पहा आणि मग ठरवा, नंतर निष्कर्ष काढून, आपली वागणूक कशी असावी ते ठरवा, तटस्थपणे !
१. विविध देशांमधे त्यावेळी कोणते धर्म होते, कोणत्या धर्माची राजसत्ता होती, प्रजेचा धर्म कोणता होता, त्यांच्याशी राजसत्तेचे वर्तन कसे होते — परिस्थिती कशी, केव्हा आणि कधी बदलली ? — आता तिथं काय परिस्थिती आहे ?
२. विविध देशांमधे राजसत्तेचा कोणता प्रकार होता, हुकूमशाही वा राजेशाही वा लोकशाही वा अन्य काही ? ती राजसत्ता कशी राबवली जायची ? निरपेक्षपणे, भावनेच्या आहारी जाऊन, वा पक्षपातीपणे ? त्यांत काही बदल झाला का ? कशामुळे बदल झाला ? —- आज काय परिस्थिती आहे ?
३. विविध देशांमधे पूर्वी कोणती संस्कृती होती, तिचे काय वैशिष्ट्य होते, त्या संस्कृतींत जनता कशी रहात होती ? त्यांवर काही आक्रमणे झाली ? आक्रमकांनी काय केले ? पूर्वीच्या आणि सध्याच्या संस्कृतीची अवस्था - फरक चांगले आणि वाईट !
— आपसात बडबड करू नका. इतिहास आणि आजचे अनुभव, यांत काही साम्य आढळते का ? विचार करा, मनन करा, चिंतन करा. कोणालाही दोष न देता, पुढे कसे वागायचे ते ठरवा ! देशहिताच्या दृष्टीने, स्वार्थीबुद्धीने फक्त आपल्यासाठी नाही. देश राहीला, तर तुमचे अस्तित्व राहील !
—- नाहीतर, करमणूक म्हणून घ्या !

31.1.2020

No comments:

Post a Comment