मराठीची आवड का निर्माण होत नाही ?
राजकवी भा. रा. तांबे यांची 'सायंकाळची शोभा', बालकवी त्रंबक बापूजी ठोमरे यांची 'श्रावणमासी' अशासारख्या निसर्गकविता तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' सारखी भव्य कल्पना असलेली कविता आणि विचारवंत रा. श्री. जोग वा आचार्य दादा धर्माधिकारी यांच्यासारखे विचारप्रवर्तक लेख तसेच आचार्य अत्रे वा राम गणेश गडकरी वा वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर यांच्यासारख्यांच्या नाटकातील उतारे तसेच श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांच्यासारखे विनोदी धडे आजकालच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांत का नसतात ?
मराठीची आवड का निर्माण होत नाही वा तिची प्रगती का होत नसावी याचा 'संशोधनाअंती' काढलेला निष्कर्ष !
१७ एप्रिल २०१६
No comments:
Post a Comment