Saturday, June 3, 2017

मिया मल्हार

मिया मल्हार

आता मृग नक्षत्र लागले ! पावसाची आपण सर्वंच वाट पाहत आहोत ! मागील दोन-तीन वर्षे वरुणराजाआपल्याला हुलकावणी देत आहे ! वरुणराजाने यंदा तरी आपली अवकृपा करू नये आणि त्याच्या कृपेच्या वर्षावात आपणास चिंब भिजवावे, हीच प्रार्थना !
संगीतातील 'मिया मल्हार' हा राग कोणाला माहित नाही ? संगीतसम्राट तानसेन याचे कर्तृत्व असलेला हा राग ! 'काफी थाट' असलेल्या या रागाची 'जाती संपूर्ण' आणि 'म वादी' आणि 'सा संवादी' आहेत.
पावसाचा आणि या रागाचा फार जवळचा संबंध आहे. या रागाच्या गायनाने पाऊस येतो ही समजूत ! बस आपला एक प्रयत्न, आपण सर्वांसाठी पाऊस आणण्याचा !
मराठीमधील 'कुहू कुहू कुहू येई साद' हे गीत 'मिया मल्हार' या रागात गुंफलेले आहे ! कवयित्री वदन विटणकर यांची ही रचना गायली आहे, अनुराधा पौडवाल यांनी आणि स्वरसाज चढविलेला आहे, अनिल - अरुण यांनी !
'दुख बरे दिन बिते रे भैय्या' हे 'मदर इंडिया' या चित्रपटातील 'नौशाद' यांनी स्वरबद्ध केलेले 'आशा भोसले. मन्ना डे, मोहंमद रफी, शमशाद बेगम' यांनी गायलेले गीत ! तसेच 'गुड्डी' या हिंदी चित्रपटातील 'वाणी जयराम' या गुणी व प्रतिभावंत गायिकेने गायलेले 'बोल रे पपी हरा' हे गीत आपण सर्वांना माहित आहे. गीत गुलझार यांचे आणि संगीत वसंत देसाई यांचे ! अत्यंत साधेपणाने, प्रभावी आणि अतिशय मोजक्याच वाद्यांसह 'वाणी जयराम' यांनी गायलेले हे गीत !

९ जून २०१६

No comments:

Post a Comment