Saturday, June 3, 2017

मालकंस

मालकंस

'सा ग म ध नी सा, सा नी ध म ग सा', हे आरोह-अवरोह 'ग, ध आणि नी' कोमल स्वर लावून सुरुवात केली की ओठावर आपोआप शब्द येतात, 'मालकंस' ! अतिशय प्रसिद्ध आणि जनमानसांत खूपच प्रचलित असलेला राग ! मलापण खूप आवडतो ! याचा थाट भैरवी !
केवळ हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातच याचे रसिक नाही तर या रागाची असलेली आवड ही झिरपत सिनेसंगीतात, नाट्यसंगीतात देखील गेली आहे. सिनेसंगीतातील 'बैजू बावरा' या संगीताने गाजलेल्या चित्रपटातील 'महंमद रफी' यांनी गायलेले आणि नितांतसुंदर संगीताने 'नौशाद' यांनी सजविलेले 'शकील बदायुनी' यांचे 'मन तडपत हरी दर्शन को आज' हे 'भक्तीगीताची' मान्यता मिळालेले गीत असो, किंवा 'नवरंग' या चित्रपटातील 'पं. भरत व्यास' यांचे 'सी. रामचंद्र' यांनी सजविलेले 'आधा है चंद्रमा, रात आधी' हे चित्रपटातील देखील अतिशय सुंदर चित्रित केलेले गीत आणि तितक्याच समर्थपणे 'महेंद्र कपूर आणि आशा भोसले' यांनी अमर केलेले गीत असो ! अशी कितीतरी गीते सांगता येतील !
नाट्यसंगीतात 'वीरदुंदुभी' या नाटकातील 'वीर वामनराव जोशी' यांचे 'पं. वझेबुवा' यांनी संगीत दिलेले 'मास्तर दिनानाथ' आणि त्यानंतर 'पं. जितेंद्र अभिषेकी' यांनी गायलेले प्रसिद्ध नाट्यगीत कोण विसरणार ? तसेच 'आचार्य प्रल्हाद केशव अत्रे' यांच्या 'पाणीग्रहण' या नाटकातील 'उगवला चंद्र पुनवेचा' हे 'श्रीनिवास खळे' यांनी संगीतबद्ध केलेले आणि प्रख्यात गायिका 'बकुल पंडित' यांनी रसिकांपर्यंत पोचाविलेले 'आचार्य अत्रे' यांचीच नाट्यपद आपणांस परिचित आहेच !

४ जून २०१६

No comments:

Post a Comment