Saturday, June 3, 2017

जगी ज्यास कोणी नाही

जगी ज्यास कोणी नाही

आज का कोणास ठावूक, सुरेल आवाजात सुमन कल्याणपूर यांनी गायलेले मधुकर जोशी यांचे दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेले हे ह्रदयस्पर्शी गीत आठवले. ते आपली एकटेपणाची, आपण एकाकी असल्याची भावना निश्चीतपणे घालवते व आपणास भक्कम आधार देते. आमचे तुकाराम महाराज नाही का पांडुरंगाला म्हणतात, -
जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती ।
चालविसी हाती, धरोनिया ।।
आपल्या पाठीशी असलेल्या परमेश्वराने वेगवेगळ्या प्रसंगी व रूपात आपले अस्तित्व दाखविले आहे. तेव्हा हे माझे आवडते गीत -
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे
भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने
नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने
अलौकिक त्याची महती अजुनी विश्व गाये
साधुसंत कबिराला त्या छळिति लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे

१५ मे २०१६

No comments:

Post a Comment