Saturday, June 3, 2017

बातम्या

बातम्या

मला वर्तमानपत्रातून समजलेल्या घटनांतील बातमी किंवा बातम्यांमागील घटना -
१. तुम्हाला जनतेची सेवा करायची असेल तर तुमच्याजवळ मंत्रीपद हवेच आणि ते पण विशिष्ट खात्याचेच ! नाहीतर समाजसेवाच जमणार नाही !
२. तुमच्या स्वातंत्र्याचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर कोणत्याही पद्धतीने आक्रमण करून त्यांच्या कामात प्राणघातक अडथळा आणणाऱ्यांच्या स्वातंत्र्याचे महत्व हे आपल्या देशाच्या, देशातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या प्राणापेक्षा व त्यांच्या स्वातंत्र्यापेक्षा जास्त आहे.
३. कोणत्याही बंडखोर, आक्रस्ताळी, या देशाला आपले न मानणाऱ्या लोकांना त्याच्या इच्छेविरूद्ध आपल्या देशांत ठेवू शकत नाही हा अन्याय आहे ! त्यांच्या मागण्या मान्य करत रहायच्या, तो म्हणतील तो प्रदेश त्यांना देत रहायचा या नादात या देशावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांवर अन्याय झाला तरी हरकत नाही म्हणजे हळूहळू देण्यासारखा प्रदेशच उरणार नाही आणि ही सर्व देशावर प्राणापलिकडे प्रेम करणारी देशांतील मंडळी आणि त्यांचे अस्तित्व त्यांच्या आक्रमकांच्या स्वाधीन होतील.
४. आत्महत्या फक्त अनुसूचीत जाती-जमातीतील किंवा बहुजन समाजातील लोकच करतात असे नाही तर उच्चशिक्षीत व उच्च समजल्या जाणाऱ्या समाजातील लोक पण करतात तथापि त्यांच्या बातमीचा उपयोग नसल्याने ती घटना उचलून धरली जात नाही.

१२ जुलै २०१६

No comments:

Post a Comment