Saturday, June 3, 2017

आरक्षण

आरक्षण

काल सहज गप्पा सुरू होत्या त्या नव्या पिढीतील मुलाबरोबर ! शास्त्र या विषयांत 'पीएच्. डी' करत होता, त्याच्या अभ्यासाची धडपड पहाता त्यांचे काम लवकर पूर्ण होईल असे वाटले.
बोलताबोलता विषय निघाला आणि त्याच्या मनातला सल बाहेर आला, 'मैंने आजतक रिजर्व्हेशन का लाभ नहीं लिया!' 'क्यू, क्या हो गया ?' मी विचारले. चर्चा बराच वेळ चालली, त्यात अजिबात आक्रस्ताळेपणा वा आकांडतांडव किंवा समाजाला दोषरूपी शिव्या देणे अथवा परिस्थितीचे भांडवल करणे यापैकी काहीही नव्हते. त्या चर्चेतून निघालेल्या बाबी आपल्या सर्वांना विचारात पाडणाऱ्या व विचार करायल्या लावणाऱ्या निश्चितच आहेत.
समाजांत आपण तीन वर्ग समजू - बुद्धीवादी, व्यापारी व उद्यागपती, शेतकरी वर्ग ! गेल्या काही वर्षातील या रिझर्व्हेशन धोरणात सुधारणा हवी, ज्यांना गरज नाही त्यांनी स्वत:हून घेवू नये. आपल्या दोन-तीन पिढ्यांनंतर तरी हे कायमचे त्या कुटुंबाने सोडून दिले पाहिजे, त्याचसोबत या योग्य व्यक्तीला नक्की मिळतील हे पाहिले पाहिजे. आपल्या देशाला या सवलती देणे परवडत नाही, देश तोट्यात जात आहे.
दुसरे म्हणजे या अनिश्चित व धरसोडीच्या धोरणाने प्रामाणिकपणावर विश्वासून असणारे व्यापारी-उद्योगपती यांचा विश्वास डळमळीत झाला, त्यांना परदेशातील संधी खुणावीत असल्याने त्याचे देशाकडे दुर्लक्ष झाले. त्यातून होणारे फायदे परदेशी गेले.
बुद्धीवादी लोकांची येथे काही खरे नाही ही भावना झाली. येथे शिकायचे, उत्तम शिक्षण परदेशांत घ्यायचे आणि तिकडेच स्थायिक व्हायचे ! कोणाला, काहीही सांगून परिणाम होणार नाही तर उलट आपल्या दैनंदिन व्यवहारात विघ्ने निर्माण होवून आपले जगणे कठिण होईल, याची खात्री असल्याने विचारवंतांचे जे काम समाजप्रबोधन ते मागे पडले.
असे काही नाही, 'रिझर्व्हेशन हे काही भारत तोट्यात पडण्याचे कारण म्हणता येणार नाही, अजूनही खूप मोठी व महत्वाची कारणे आहेत. हा समाज सर्वांगाने पुढे यावा, विकसीत व्हावा तर आरक्षण हवे आहे. 'हे पहा, मला गरज नाही, मी घेतले नाही त्याने देशाचे काहीतरी तर रुपये वाचले असतील, तेवढे जरी मी वाचवू शकलो तरी खूप आहे. आणि महत्वाचे म्हणजे-उद्या असे कोणी म्हणायला नको की यांना देवूनदेवून भारत तोट्यांत गेला.

२ मार्च २०१६

No comments:

Post a Comment