आजच्या रामायणातील रजक
आज सध्याच्या पंतप्रधानांबाबत अथवा कोणी खंबीरपणाने चांगले काम करत असेल त्यांच्याबाबत जे त्यांचे चारित्र्यहनन करण्याच्या स्वरूपातील प्रश्न विचारत असतील आणि त्याबाबत 'मर्यादापुरूषोत्तम प्रभू रामचंद्र व त्यांच्या कर्तणुकीचा दृष्टांत' देत असतील तसेच केवळ एका धोब्याच्या संशयावरून प्रत्यक्ष रामचंद्रांनी आपल्या पत्नीचा त्याग केला हा दाखला देत असतील तर हा दृष्टांत अनाठायी व येथे योग्य नाही.
कारण येथे फरक म्हणजे तेव्हा प्रश्न विचारणारा पण 'सत्ययुगातील धोबी' म्हणजे प्रजेतील एक होता, त्याला ना प्रभू रामचंद्रांच्या राज्याची अपेक्षा होती ना त्यांस प्रभू रामचंद्रांना राज्यावरून हुसकावून लावायचे होते ना सीतामाईंबाबत द्वेष होता.
आजची गाठ ही शंका उपस्थित करणाऱ्या 'कलियुगातील एका किंवा समानधर्मी व समानध्येयी 'राज्यकर्त्याशी' आहे की ज्याचे ध्येय तुमचे राज्य हिसकावणे हे आहे वा तुम्हाला पदच्युत करणे हे आहे कारण तुम्ही सत्तास्थानावर असल्याने त्यांच्या पूर्वींच्या कृष्णकृत्यांची चौकशी होवून त्यांना शासन होण्याची शक्यता आहे, हे कोणासही आवडणारे नाही. सबब येथे वैयक्तिक हितसंबंध आहे रामायणकालीन रजकाचे नव्हते.
तेव्हा हा विषय आजची राज्यपद्धत लक्षात घेता राजाच्या केवळ वैयक्तिक बाबीसंबंधी नसून त्याच्या संपूर्ण राज्यावर व प्रजेवर होणाऱ्या परिणामांबाबत आहे. म्हणून अशा बाबींमुळे, त्याच्या वैयक्तिक इच्छाआकांक्षांमुळे जर इतर निरपराध प्रजा निष्कारण अडचणीत येणार असेल, त्यांचे हितसंबंध धोक्यात येणार असतील तर त्यांच्या या वर्तनांस त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे कारण हे वर्तन 'मधुतिष्ठति जिव्हाग्रे, ह्रदयी तु हलाहल' या स्वरूपाचे आहे.
७ मे २०१६
No comments:
Post a Comment