Saturday, June 3, 2017

बा कायद्या - चेतन किशोर जोशी यांचा काव्यसंग्रह

बा कायद्या - चेतन किशोर जोशी यांचा काव्यसंग्रह

श्री. चेतन किशोर जोशी यांचा 'बा कायद्या ! हा काव्यसंग्रह त्यांनी मला मागील भेटीत प्रेमाने दिला. तो वाचूनही कधीचाच झाला पण त्यावर काही अद्याप लिहीले नाही, त्याला पहिले कारण माझा थोडा आळस हे समजता येईल पण दुसरे कारण की हे वाचल्यावर मी माझ्या कॉलेजच्या दिवसांत, त्या भावविश्वात गेलो.
त्यातील सर्वच कविता मनाची वेदना स्पष्ट करणाऱ्या आहेत, पण मला 'भारत बंद', 'रक्तरंजित जबाबदारी', 'पुन्हा एकदा ... स्वातंत्र्यलढा', 'चर्चा', 'कुलूपबंद जातीयता', 'पैसा झाडाला लागत नाही' या जाणवल्या !
आसपासच्या अनुभवातून जो राग, नैराश्य, वैफल्य, उद्वेग येतो तो स्वाभाविकपणे व्यक्त होतो. पण ही परिस्थिती असली तरी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आपण सोडून देणे सर्वथैव अयोग्य आहे, एवढेच नाही तर ते अंतीमत: घातकारक ठरते. याचे उत्तर 'पुन्हा जन्म घ्या' यातून दिलेले आहे.
हा विचार त्यांना मला वैयक्तिकपणे सांगता आला असता पण मी थेट येथेच व्यक्त केला. आपणासही या निमित्ताने त्यांचे काव्यरूपातील विचार वाचता येतील.
Chetan Kishor Joshi आपण माझेसमोर आपल्या काव्यरूपातील भावना व्यक्त केल्यात, त्यासाठी मला विश्वासू समजले,धन्यवाद !

२८ फेब्रुवारी २०१६

No comments:

Post a Comment